
सावली(सौरव गोहणे)
सावली तालुक्यातील उसेगाव येथील शेत शिवारात नेहमीप्रमाणे चराईसाठी गेले असताना वादळी हवामानामुळे विजेच्या खांबाच्या तारा तुटून पडले होते त्या जीवंत तारांना स्पर्श लागल्याने आठ जनावरे ठार झाल्याची घटना आज दिनांक 24 शनिवार दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की उसेगाव येथील नेहमीप्रमाणे चराई साठी गेलेल्या बैलांपैकी 6 बैल व 2 गाय विद्युत खांबाच्या खाली आले असता तुटून असलेल्या तारा च्या प्रवाहा च्या संपर्कात आल्याने आठ बैलांच्या जागेत मृत्यू झाल्याची घटना उद्धव रोहनकर यांच्या शेतात आज दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बैलाला कोणी हात लावू नये असे सूचना देऊन त्वरित महावितरण कंपनीला घटनेबाबतची माहिती दिली असता माहिती मिळतात आपल्या सहकाऱ्यांसोबत विद्युत कर्मचारी घटनास्थळावर हजर होऊन विद्युत पुरवठा बंद केले. या अपघातात कालीदास पाल 1 बैल, बाळुजी ठुसे 1बैल, संतोष भोयर 1 गाय, देवाजी भोयर 1 बैल, हिराजी गोहणे 1 गाय, माणिक गोहणे 1 बैल, अरुण भोयर 1 बैल, भोजराज गोहणे 1 बैल यांचा पंचनामा करून घडलेल्या घटनेत अंदाजे 30 ते 50 हजार रुपये प्रति किंमतीचे असे आठ जनावरे ठार झाले.
या बैलांच्या मदतीने रोजी रोटी कमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन गेल्याने शेतकरी हतबल झाले असून आता त्यांच्या समोरच्या संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.घटनास्थळी आपले जनावरे मरण पावल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले नाही.ढसाढसा रडू लागले होते.
झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनी कडून व शासनाकडून या बैल मालकाला त्वरित मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे केली जात आहे.