
जनआक्रोश मोर्चा

आज दिनांक 14/02/2025 ला सावली तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवून महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आंनद बावणे व तालुका अध्यक्ष स्वप्नील पेटकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा मध्ये शेतकऱ्यांचा पीकविमा देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या डबल फसल ला पाणी देण्यात यावा, रेटघाट सरकारी डेपो सुरू करून सरकारी दरात घरकुलाला रेती देण्यात यावी, पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज , निवडणुकीचा अधिकार देण्यात यावा, शेतकऱ्यांचे पांदन रस्ते सुरळीत करावे. त्यांना इच्छेनुसार पांदन रस्ता द्यावा, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी,ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल द्यावा.
अशा विविध मुद्द्यांवरती जनाकरोश निषेध मोर्चा घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी सेना आनंद बावणे , जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ मडावी, मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष स्वप्नील पेटकर ,जिल्हा सचिव सूरज मडावी , मंगेश ठाकरे , विजू लोंढे , मोतीराम ढाक, देविदास निकोडे , प्रभाकर भांडेकर , दिवाकर निकोडे , विनुदास कोवे,चेतन मोहर्ले, दिलीप मलोडे,अनिल ठाकरे ,महेंद्र ठाकरे , गोविंद उईके , प्रणय वाकडे ,सुरेश कालबंधे ,महेश नन्नावरे ,
तसेच ,अंतरगाव, मेहा, पालेबारसा, मंगरमेंढा , बारसागड , निफांद्रा ,विहिरगाव , आकापूर, करोली या गावचे शेकडो शेतकरी उपस्थित होते.